विशेष

‘मारावे परी किर्तिरुपी उरावे’ घरावर तिरंगा लावताना कौल तुटून…

पालघर | १५ ऑगस्ट रोजी आपल्या भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन आहे. त्यामुळे सगळीकडे वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. यात शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांना देशाचे महत्व सांगत अनेक उपक्रम सुरू आहेत. तर शहरात आणि गावात देखील वेगवेगळ्या उक्रमाअंतर्गत ७५ व्या स्वातंत्र्य दिनाची जंगी तयारी सुरू आहे.

 

यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझादीका अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्याचे आश्वासन केले आहे. आपला राष्ट्रध्वज प्रत्येक घरावर असावा असा याचा उद्देश आहे. तसेच जनतेला आपल्या तीरंग्या प्रती आदर आणि प्रेम निर्माण व्हावे अशी या मागची भावना आहे.

 

त्यामुळे प्रत्येक राज्यात, शहरात आणि खेड्या पाड्यातील व्यक्तींनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे सगळीकडे हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला जात आहे. मात्र यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

 

हर घर तिरंगा हा उपक्रम राबवत असताना एका वृध्द व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. ते वृद्ध आजोबा आपल्या घरावर उभे राहून राष्ट्र ध्वज लावत होते. त्यावेळी घरावर असलेले कौल तुटले. त्यामुळे ते आजोबा जोरात जमिनीवर आपटले. यात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचे निधन झाले. यामुळे संपूर्ण गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे. सर्व जण हळहळ व्यक्त करत आहेत.

 

जव्हार येथील राजेवाडी या गावात ही घटना घडली आहे. इथे लक्षमन भाऊ शिंदे हे वृध्द राहत होते. ते ६५ वर्षांचे होते. देशा प्रती मनात असेले प्रेम व्यक्त करताना हा प्रकार घडला. त्यांनी आपल्या घरावर तिरंगा लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिरंगा न लागता त्यांचा जीव गेला.

 

घरावर तिरंगा एफडकवताना कौल तुटले त्यामुळे ते खाली पडले. शनिवारी सकाळी हा अपघात झाला. यावेळी त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ जव्हार उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले. यावेळी त्यांच्यावर उपचार करण्यात आले मात्र यात त्यांचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close