दिल्लीच्या खेळाडूचे T 20 मध्ये द्वीशतक, असा कारनामा करणारा पहिलाच भारतीय खेळाडू

दिल्ली | सुबोध भाटि, दिल्लीकडून खेळणारा तरुण फलंदाज.आपण विचारही करू शकत नाही अशी त्याने कामगिरी केली आहे. त्याने T 20 सामन्यामध्ये द्वीशतक केले आहे. दिल्ली एलेवन न्यू कडून ओपनेर म्हणून फलंदाजी करत असताना त्यांनी सिंभा संघा विरूद्ध द्वी शतकीय कामगिरी केली.
त्याने २०५ धावा फक्त ७९ बॉल्स मध्ये केल्या. या मध्ये त्याने १७ चौकार व १७ षटकार मदतीने हा इतिहास रचला. सुबोध भाटी याने १७० धावा तर फक्त चौकार व षटकार मारून काढल्या आहेत.
सुबोध भाटी हा रणजी क्रिकेट पण खेळलेला खेळाडू आहे. त्याने फलंदाज म्हणून नेहमीच आपली कामगिरी चांगल्या पद्धतीनं बजावली आहे. सुबोध भाटी याने ही खेळी खेळत असताना १७ बॉल्स मध्ये १०२ रण करण्याचं इतिहास रचला.हा त्याचा स्ट्रिकरेट २५० पेक्षा जास्त होता.
अशी कामगिरी करणारे दिग्गज ख्रिस गेल,अंद्रे रसल, डी विल्लायर्स त्यांना त्याने माघे टाकले आहे. सुबोध भाटि याला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन